Friday, July 6, 2012

विजयी विश्व तिरंगा प्यारा.....


प्लीज नक्की वाचा....
आजचा पेपर उघडला आणि पाहिलं तर सगळी कडे एकच बातमी. "मंत्रालयाला आग लागली" म्हणून.... तसं बातमी वाचायची ईछा नव्हती. .. पण एका बातमी ने माझं लक्ष खेचून घेतलं... आणि मला अभिमान वाटल्या त्या लोकांचा..
बातमी होती...
जेव्हा मंत्रालयाला आग लागली तेव्हा काही लोग धावत खाली येत होते. आपले मंत्री तर मंत्रालयात नव्हतेच.
तुम्हाला माहितीच असेल आपल्या मंत्रालयावर आपला राष्ट्रध्वज आहे.... तर राष्ट्रध्वज ज्या बिल्डींगवर असतो त्याना एक नियम असतो तो म्हणजे राष्ट्रध्वज हा नेहमी सूर्यास्त नंतर खाली उतरवला जातो...

आता ह्या सर्व घाई गडबडीत राष्ट्रध्वजला कोण लक्ष्यात ठेवणार हो.....

पण मंत्रालयावर दररोज सकाळी राष्ट्रध्वज फडकवणे व सूर्यास्तानंतर तो उतरवून ठेवणे हे काम करणारे कर्मचारी मंत्रालयाला आग लागताच झेंडा वाचवण्याकरिता सहाव्या मजल्यावरील चबुतऱ्यावर चढून उभे राहिले . त्यांच्यासोबत भयभीत झालेले काही कर्मचारीही होते . आगीची तीव्रता वाढताच सूर्यास्तापूर्वीच राष्ट्रध्वज उतरवून हे कर्मचारी स्नॉर्केलच्या सहाय्याने खाली उतरले .

मंत्रालयाच्या सहाव्या व सातव्या मजल्यावर आग पसरली तेव्हा मंत्रालयावरील राष्ट्रध्वजाशेजारी पाच - सहा कर्मचारी उभे होते . खालून हे दृष्य पाहणाऱ्यांना हे कर्मचारी अडकल्याचे व संकटात असल्याचे जाणवत होते . मात्र आगीची तीव्रता पाहून त्यांनी ध्वज उतरवला व त्यानंतर हे कर्मचारी स्नॉर्केलच्या सहाय्याने खाली उतरले .

ह्या लोकांनी हि आगच लावली कि हो.. पण आजच्या माझ्या सारख्या तरुण पिढीच्या हृदयात आणि ती पण अभिमानाची.....

hats off .......

तुमच्या साठी मी इथे फोटो शेअर करत आहे......

प्लीज प्लीज प्लीज हा स्टेटस शेअर करा

-आलेख पाटणकर


No comments: