Thursday, July 19, 2012

मृणालताई गोरे.






मृणालताई गोरे.
एक झंजार समाजवादी नेत्या. त्यांची दुसरी ओळख म्हणजे "पाणीवाली बाई". कारण त्यांचे कर्तुत्वच तसे होते.
एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी अखं आयुष्य गोरगरीब जनतेला पाणी , रेशन , घर मिळावे यासाठी घालवलं. मग का पाणीवाली बाई हे नाव नाही मिळणार...
अश्या व्यक्तिमत्वाचा १६ जुलै २०१२ निधन झाले.... त्यांच्या कर्तुत्व मुळेच कि काय , पोलिसांनी दिलेल्या सलामीनंतर राष्ट्रध्वजाने आच्छादलेले मृणालताईंचे पार्थिव सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आले .

आज त्यांच्या अखेरच्या प्रवासाबद्दल वाचलं आणि डोक्यात अचानक विचार आला..... मृणालताई गोरे गेल्यात आणि त्यांनी जाताना अजून एक पाणी प्रश्न सोडवून गेल्यात.... तुम्ही निरीक्षण केलत मुंबई आणि इतरत्र १८ जुलै पासून जोरात पाउस चालू झाला...
त्यांनी स्वर्गात गेल्या गेल्या आपल्या माणसांचा पाण्याचा प्रश्न सोडवला..... आशी माणसं पुन्हा होणे नाही.. एखाद्या वेळेस राजेश खांना पुन्हा जन्माला येईल हो पण मृणालताई गोरे नाही येऊ शकणार.....

अश्या मोठ्या व्यक्तिमत्वाला मी श्रद्धांजली वाहतो... देव त्यांच्या आताम्याला शांती देवो आणि त्या परत जन्म घेऊन भारतातच येवोत.....

-आलेख पाटणकर

मी इथे हे हि मान्य करतो कि त्यांच्या कर्तुत्व बद्दल मी हि पूर्णपणे अज्ञानी आहे. तरी हि जे मनात होतं ते बोलतोय...

No comments: