सध्या मी एका गोष्टीचा फार निरीक्षण केलंय आणि ते म्हणजे तुम्ही एक पाहिलंय का आज काळ कावळे फार खालून उडतात.. कधी कधी तर चालणारयांच्या आंगावर पण झेपावतात...
हायवेवर पहाल तर बरेच कावळे गाडी खाली येऊन मरून पडलेले दिसतील.. कळत नाही का ते... आधी नव्हतं असं...
कालच एका कावळ्याने मला प्रसाद दिलाय.... थोड्या आठवड्यापूर्वी माझ्या सासू ला मग माझ्या आईला आणि काल मला मिळालाय प्रसाद....
सासरे तर सांगत होते कि आपण कावळे शांती करून घेऊ :D
पण माझ्या मते कावळ्यांनी बहुदा काकस्पर्ष जरा जास्तच मनावर घेतलाय :D
आता सचिन खेडेकर सारखा मला विचारावस वाटत का का का ?
No comments:
Post a Comment