Sunday, July 8, 2012

विक्रम वेताळ


आजचा एकदम कोड्यात टाकणारा स्टेटस:

आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी मिळतात तर काही नाही मिळत. मग आपण खुश नाही तर दुखी होतो.. पण ह्या मध्ये मी एक निरीक्षण केलंय.. म्हणजे बघा हा..
एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली कि तुम्ही आधी हिरमुसता आणि मग मनाला समजावता कि नसेल आपल्या नशिबात... मग तुम्ही परत नेहमीच्या कामाला लागता... तुम्ही दुखी असता पण तेव्हा त्याच तीव्रता असते अवघे ५०%... मग एक दिवस तुम्हाला कळत कि कोणी तरी ३ रया व्यक्तीला तीच गोष्ट मिळते.. भले त्याने ३-४ वेळा प्रयत्न केला असेल त्या साठी.. त्या व्यक्तीचा आणि तुमचा काडी मात्र संबद्ध नसतो...
आणि तुम्ही परत दुखी होता... मात्र ह्या वेळी दुखी होण्याची तीव्रता असते १००%...
मग आता मला सांगा खरं दुख कसलं...
१. आपल्याला गोष्ट न मिळाल्याचं?
२. दुसरयाला गोष्ट मिळाल्याचं?
३. कि आपल्याला गोष्ट न मिळाल्याचं पण दुसरयाला गोष्ट मिळाल्याचं?

उत्तर द्या नाही तर मी चाललो

No comments: