Thursday, July 19, 2012

सुनिता विल्यम्स आणि आम्ही



सुनिता विल्यम्स.
अर्थात मला पण माझा स्टेटस ची सुरवात अशीच करून देत कि. "एक भारतीय वंशाची अंतराळवीर" वैगरे वैगरे.......
पण तुम्हाला माहित्ये तिचे बाबा एक गुजराती होते आणि एक भारतीय.. कालांतराने ते US ला गेले आणि त्यांनी तिथे Slovenian मुलीशी लग्न केलं. त्यांना झाली सुनिता. बर त्या सुनिता ने विल्यम्स नावाच्या मुलाशी लग्न केलं जो आहे US चा..
त्या हून कमी कि काय ती आता ज्या मिशन साठी अंतराळात गेलीये त्याचा भारताशी काडीमात्र संबद्ध नाही. पण तरी भारत प्रत्येक वेळी हेच गाण गुणगुणत बसलाय कि भारतीय वशांची मुलगी अंतराळात गेलीये.....

मला एक प्रश्न सोलिड पडतो कि किती वर्ष भारत हेच करणारे कि आमच्या वंशाचा माणूस इथे गेला आणि तिथे गेला.... का असा कधी होत नाही कि एक सुनिता देशपांडे किवां सुनिता विल्यम्स हि भारतात जन्माला येते आणि भले अमेरिके तर्फे अंतराळात जाते.... बस एक राकेश शर्मा होता आणि त्या नंतर कल्पना चावला होती.......... राकेश शर्मा गेला होता १९८४ मध्ये आणि कल्पना चावला २००३ मध्ये जेव्हा तिचे निधन झाले....

मला इतकाच म्हणायचं कि करोडो लोकसंख्या असलेला ह्या देशातून १९८४ - २०१२ पर्यंत फक्त २ च अंतराळ वीर जावे आणि मग आपल्याला आपल्या "वंशाचा" "अंश" शोधावा लागावा. आणि त्या वर खुश रहाव लागावे..
म्हणजे इथे पण शिवाजी जन्मावा पण बाजुच्याच्या घरात.. आम्ही फक्त हा शिवाजी हा आमचा शेजारी होता म्हणून मिरवत रहावं

No comments: