Friday, August 3, 2012

क्योंकी कि हर एक फ्रेंड जरुरी होता है....


आपल्याला बरेच मित्र मैत्रीण असतात.. मला हि आहेत.. पण कालांतराने सगळे बिझी होतात आणि मग कमी होतो तो एकमेकांमधला संवाद... मग कधी तरी खूप गरज वाटते एखाद्या मित्राची, वाटत सगळं सोडून त्याला भेटायला जावं थोडं बोलावं त्याच्याशी.... पण तो पर्यंत आपण ती संधी घालवून बसलेलो असतो. मग चालू होतो तो मनातला खेळ, कि काय करू मी, करू कि नको त्याला call ..
नको तो विसरला असेल. किवा कामात असेल.
बऱ्याचदा असे होते कि आपण आवर्जून मित्रांना फोन करतो ते पण तेवढ्याच पुर्त बोलतात.. मग दुसरा खेळ चालू होतो मनात कि ह्या वेळी मी केला फोन आता मित्र करेल मला आणि तसं कधीच होत नाही...
टाळी मित्रानो कधीच एका हाताने वाजत नाही... कधी तरी मित्राला स्वताहून फोन करा.. जर कोणी मित्र तुम्हाला फोन करत असेल तर कधी तरी त्याला तुम्ही फोन करा...

क्योंकी कि हर एक फ्रेंड जरुरी होता है....

No comments: