Tuesday, July 24, 2012

दाम्बिकपणा


माझा आजचा स्टेटस हा चालू असलेल्या दाम्बिकपणा वर आहे ना कि देवावर.. माझा हि देवावर तुमच्या इतकच प्रेम आहे.

दररोज शॉवर ने अंघोळ कळणाऱ्या एखाद्यावर एकदम BMC चा पाईप फुटून पाण्याचा मारा झाला तर त्याला जसं वाटत असेल तसं आता जगात फक्त एकालाच वाटत असेल...
आणो तो आहे....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आपला लाडका शंकर देव.....

माझ्या सर्व मित्र परिवाराला श्रावणी सोमवारच्या शुभेच्या.....

आणि शंकर देवा अजून ३ सोमवार आहेत रे..... हे असाच प्रेम चालू राहिला तर गणपत्ती बाप्पा पण रक्षण नाही करू शकणार

देव आपला लाडकाच आहे.. फक्त श्रद्धेच्या पोटी त्याच्यावर प्रेम थापू नका........

सबकुच



आजचा स्टेटस तुम्हाला थोडा अश्लील वाटेल.. पण हि गोष्ट माझ्या बरोबर घडलेली आणि एक मजेशीर गोष्ट आहे म्हणून शेअर करतोय... प्लीज पूर्ण वाचा

६ एक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी मालाड ला कामाला होतो.तिथे नवीन असल्यामूळे मला तिथल्या आजूबाजूच्या एरियाचा काही पत्ता नव्हता. तेव्हा बाईक नसल्याने मी बस ने जायचो. अर्थात बसला तुडूंब गर्दी असायची. लोकक अक्षरक्षा चिटकून उभी राहायची. एकदा मी हि असाच उभा होतो. माझ्या बाजूला एक सुंदर मुलगी आली. त्यात मुंबई मध्ये एक सवय आहे. खूप गर्दी असेल तर लोकक पैसे पुढच्या माणसा कडे देतात आणि त्याला सांगतात कि conductor ला हे पैसे द्या आणि ह्या ह्या स्टोप चा तिकीट सांगा... ..

तर त्या मुलीने माझ्या कडे पैसे दिलेत आणि म्हणाली " सबकुच निकालो"
मी गोंधळंलो , मी म्हणालो "क्या? आपको क्या चाहिये"
ती परत म्हणाली " प्लीज सबकुच निकालो ना?" ह्या वेळी ती जरा त्रस्त वाटत होती...
माझ्या मनात विचार आला अशी काय हि.... मग मी विचार केला.. पैसे पुढे देऊन तर बघू काय होतं आणि मी ते पैसे पुढे पास केलेत आणि मी हि पुढच्या माणसाला म्हणालो " प्लीज सबकुच निकालो"....
मनात असंख्य विचार चालू होते कि हि मुलगी असं कसं विचारू शकते...
आणि हे विचार चालू असताना मगासाच्याच माणसाचा आवाज आला" ये लो भाई साहब" असं बोलून त्याने माझ्या पुढे तिकीट केलं...
मी हि निमूट पणे ती तिकीट घेऊन तिला दिलं... आता तर मी पूर्णच गोंधळंलेलो

मग मी office ला गोंधळंलेल्या अवस्थेत पोहचलो आणि तिथल्या हाउसकीपिंग वाल्या मुलाला विचारल कि "काय रे बाबा इथे सबकुच नावाचं काही आहे का "
तो हसला आणि म्हणाला "हो साहेब २ स्टोप सोडलेत ना तर एक सबकुच मंझील नावाचा स्टोप आहे लोकक त्याला सबकुच म्हणतात"

आणि सगळं कोड सुटलं...

मालाडला इन ओर बिट आधी एक हॉटेल आहे त्याचा नाव सबकुच मंझील आहे :)

Thursday, July 19, 2012

सुनिता विल्यम्स आणि आम्ही



सुनिता विल्यम्स.
अर्थात मला पण माझा स्टेटस ची सुरवात अशीच करून देत कि. "एक भारतीय वंशाची अंतराळवीर" वैगरे वैगरे.......
पण तुम्हाला माहित्ये तिचे बाबा एक गुजराती होते आणि एक भारतीय.. कालांतराने ते US ला गेले आणि त्यांनी तिथे Slovenian मुलीशी लग्न केलं. त्यांना झाली सुनिता. बर त्या सुनिता ने विल्यम्स नावाच्या मुलाशी लग्न केलं जो आहे US चा..
त्या हून कमी कि काय ती आता ज्या मिशन साठी अंतराळात गेलीये त्याचा भारताशी काडीमात्र संबद्ध नाही. पण तरी भारत प्रत्येक वेळी हेच गाण गुणगुणत बसलाय कि भारतीय वशांची मुलगी अंतराळात गेलीये.....

मला एक प्रश्न सोलिड पडतो कि किती वर्ष भारत हेच करणारे कि आमच्या वंशाचा माणूस इथे गेला आणि तिथे गेला.... का असा कधी होत नाही कि एक सुनिता देशपांडे किवां सुनिता विल्यम्स हि भारतात जन्माला येते आणि भले अमेरिके तर्फे अंतराळात जाते.... बस एक राकेश शर्मा होता आणि त्या नंतर कल्पना चावला होती.......... राकेश शर्मा गेला होता १९८४ मध्ये आणि कल्पना चावला २००३ मध्ये जेव्हा तिचे निधन झाले....

मला इतकाच म्हणायचं कि करोडो लोकसंख्या असलेला ह्या देशातून १९८४ - २०१२ पर्यंत फक्त २ च अंतराळ वीर जावे आणि मग आपल्याला आपल्या "वंशाचा" "अंश" शोधावा लागावा. आणि त्या वर खुश रहाव लागावे..
म्हणजे इथे पण शिवाजी जन्मावा पण बाजुच्याच्या घरात.. आम्ही फक्त हा शिवाजी हा आमचा शेजारी होता म्हणून मिरवत रहावं

मृणालताई गोरे.






मृणालताई गोरे.
एक झंजार समाजवादी नेत्या. त्यांची दुसरी ओळख म्हणजे "पाणीवाली बाई". कारण त्यांचे कर्तुत्वच तसे होते.
एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी अखं आयुष्य गोरगरीब जनतेला पाणी , रेशन , घर मिळावे यासाठी घालवलं. मग का पाणीवाली बाई हे नाव नाही मिळणार...
अश्या व्यक्तिमत्वाचा १६ जुलै २०१२ निधन झाले.... त्यांच्या कर्तुत्व मुळेच कि काय , पोलिसांनी दिलेल्या सलामीनंतर राष्ट्रध्वजाने आच्छादलेले मृणालताईंचे पार्थिव सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आले .

आज त्यांच्या अखेरच्या प्रवासाबद्दल वाचलं आणि डोक्यात अचानक विचार आला..... मृणालताई गोरे गेल्यात आणि त्यांनी जाताना अजून एक पाणी प्रश्न सोडवून गेल्यात.... तुम्ही निरीक्षण केलत मुंबई आणि इतरत्र १८ जुलै पासून जोरात पाउस चालू झाला...
त्यांनी स्वर्गात गेल्या गेल्या आपल्या माणसांचा पाण्याचा प्रश्न सोडवला..... आशी माणसं पुन्हा होणे नाही.. एखाद्या वेळेस राजेश खांना पुन्हा जन्माला येईल हो पण मृणालताई गोरे नाही येऊ शकणार.....

अश्या मोठ्या व्यक्तिमत्वाला मी श्रद्धांजली वाहतो... देव त्यांच्या आताम्याला शांती देवो आणि त्या परत जन्म घेऊन भारतातच येवोत.....

-आलेख पाटणकर

मी इथे हे हि मान्य करतो कि त्यांच्या कर्तुत्व बद्दल मी हि पूर्णपणे अज्ञानी आहे. तरी हि जे मनात होतं ते बोलतोय...

Sunday, July 8, 2012

तुझ्या आईची शपथ

आजचा एकदम मस्त स्टेटस

आज सकाळी डोक्यात असाच लहानपणीचा आणि आताच्या आयुष्याचा विचार आणि Comparison (तुलना) चालू होतं ... आणि एक मजेशीर गोष्ट लक्ष्यात आली..

आपण लहान होतो तेव्हा म्हणायचो "तुझ्या आईची शपथ". हे बोलल्यावर समोरचा खरं बोलेल अशी खोटी आशा... : )
मग आपण थोडे मोठे झालो आणि वाटलं आईची शपथ ने काही चालत नाहीये मग आपण बोलायला लागलो "तुझ्या आई रक्ताची शपथ". हे बोलल्यावर समोरचा खरं बोलेल अशी अजून खोटी आशा... : )
मग आपण अजून म्हणजे जास्त अक्कल असल्याच्या वयात आलो आणि
मग आपण बोलायला लागलो "तुझ्या आईची _____". हे बोलल्यावर समोरचा खरं बोलेल अशी अजून खोटी आशा... : )

मग काय बदल झाला.. आपल्यात, आपल्या विचारात, समोरच्या माणसात कि परीस्थितीत...

एक मित्र


आजचा मोठा पण खरचं वाचण्या सारखा स्टेटस....

बरयाचदा आपण एखाद्या निष्कर्षावर फ़ार लवकर पोहचतो.. एखादि गोष्ट घडते आणि आपण त्यातुन वेगळाच अर्थ काढतो आणी जेव्हा आपल्याला खंर कारण कळतं तेव्हा आपल्याला आपलीच लाज वाटते...
त्या दिवशी माझ्या बरोबर पण असंच घडलं.
मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितल मि भेटायला येतो.. तो म्हणाले ये मि वाट पहतोय... मि निघताना परत त्याला फोन केला आणि तो हि म्हणाली "ये मि आहे घरी"..
मि घरी पोहचलो तर मला कळंल कि तो बाहेर त्याच्या मित्राकडे गेलाय. माझा राग अनावर झाला... कि ह्याला आधि का नाही सांगता आलं... आणि मि "ठिक आहे" म्हणुन निघालो.. मनात राग होताच...
मग तो थोड्या वेळाने मला भेटायला आला.. मि म्हणालो..
"अरे भेटायचं नव्हत तर सांगायच ना यार"
त्या वर तो म्हणाला...
" अरे तसं नाही रे माझ्या एका मित्राच्या बायकोचं मिसकँरेज झालं आणि तो तेव्हा घरी नव्हता... त्याचे आई वडिल पण नव्हते.. म्हणुन त्या मित्राने मला फोन केला आणि म्हणाला... प्प्लिज तिला डाँक्टर कडे घेउन जाशील का?
बस मित्रा मी पैसे घेउन तिला डाँक्टर कडे घेउन गेलो म्हणुन तुला भेटु नाही शकलो... माफ़ कर"

खर सांगु मलाच माझी लाज वाटली... पण त्यातुन मि दोन धडे शिकलो..
१. कधिच लगेच निष्कर्षा वर नका पोहचु.
२. आणि जिवाला जिव देणारे चांगले मित्र मला आहेत..

विक्रम वेताळ


आजचा एकदम कोड्यात टाकणारा स्टेटस:

आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी मिळतात तर काही नाही मिळत. मग आपण खुश नाही तर दुखी होतो.. पण ह्या मध्ये मी एक निरीक्षण केलंय.. म्हणजे बघा हा..
एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली कि तुम्ही आधी हिरमुसता आणि मग मनाला समजावता कि नसेल आपल्या नशिबात... मग तुम्ही परत नेहमीच्या कामाला लागता... तुम्ही दुखी असता पण तेव्हा त्याच तीव्रता असते अवघे ५०%... मग एक दिवस तुम्हाला कळत कि कोणी तरी ३ रया व्यक्तीला तीच गोष्ट मिळते.. भले त्याने ३-४ वेळा प्रयत्न केला असेल त्या साठी.. त्या व्यक्तीचा आणि तुमचा काडी मात्र संबद्ध नसतो...
आणि तुम्ही परत दुखी होता... मात्र ह्या वेळी दुखी होण्याची तीव्रता असते १००%...
मग आता मला सांगा खरं दुख कसलं...
१. आपल्याला गोष्ट न मिळाल्याचं?
२. दुसरयाला गोष्ट मिळाल्याचं?
३. कि आपल्याला गोष्ट न मिळाल्याचं पण दुसरयाला गोष्ट मिळाल्याचं?

उत्तर द्या नाही तर मी चाललो